नवी दिल्ली : केरळ येथे नुकत्याच आलेल्या पुराचा फटका बसलेल्या लोकांच्या मदतीसाठी सॅमसंग इंडियाने मदतीचा हात पुढे केला आहे. पूरग्रस्तांसाठी ग्राहक सेवा व्हॅन्स तैनात करण्यात आल्या असून, रिलिफ कॅम्पही उभारले जाणार आहेत. कंपनीची तीन केंद्रे आणि दोन कारखान्यातील कर्मचारीही केरळमधील लोकांसाठी योगदान देणार आहेत.
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सॅमसंग इंडियातर्फे केरळ चीफ मिनिस्टर डिस्ट्रेस रिलिफ फंडाला (सीएमडीआरएफ) १.५ कोटी रुपयांचे योगदान दिले जाणार आहे; तसेच केरळ राज्यातील लोकांसाठी १० हजार बेडिंग सेट्स दान केले जाणार आहेत. सॅमसंगच्या तिरूवनंथपुरम येथील प्रतिनिधींतर्फे संबंधित रकमेचा धनादेश केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांना दिला जाणार आहे.
राज्यातील रिलिफ कॅम्पद्वारे मोबाइल चार्जिंग स्टेशन्स तसेच खाद्यपदार्थ, दूध आणि औषधे ठेवण्यासाठी सॅमसंग रेफ्रिजरेटर्स, अन्न गरम करण्यासाठी सॅमसंग मायक्रोवेवस मनोरंजनासाठी सॅमसंग टीव्ही तसेच लोकांना आपले नातेवाईक आणि प्रियजनांशी संपर्क करता यावा म्हणून मोफत व्हॉइस व व्हिडिओ कॉलिंगची सुविधा देणारे सॅमसंग मोबाइल फोन्स पुरवले जाणार आहेत.
ग्रामीण भारतातील ग्राहकांना दर्जेदार सेवा देण्याच्या हेतूने २०१७ मध्ये राज्यात दाखल करण्यात आलेल्या सॅमसंग ग्राहक सेवा व्हॅन्सद्वारे राज्यातील सॅमसंग ग्राहकांना सेवा दिली जाणार आहे.